वाशिम :- खाजगी बाजारामध्ये पांढरा सोन्याची आवक वाढल्याचे दिसून येत आहे यावर्षी पाऊस चांगल्या प्रमाणात पडल्यामुळे शेतकऱ्यांना कापसाचे उत्पादन समाधानकारक झाले, शेतकऱ्यांनी कापसाचे वेचणी सुद्धा केली पण कापूस बाजारात नेल्यानंतर भाव समाधानकारक न मिळाल्यामुळे मोठ्या शेतकऱ्यांनी कापूस साठवून ठेवला आहे.
तर लहान शेतकऱ्यांना पर्याय नसल्यामुळे कापूस विकावे लागत आहे, कापसाचा दर समाधान कारक न मिळाल्यामुळे शेतकऱ्याकडून नाराजीच्या सूर उमटताना दिसत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, कापसाचे उत्पादन शेतकऱ्यांना परवडण्याजोगे आहे व यावर्षी पावसाने साथ दिल्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन सुद्धा समाधानकारक झालेले आहे, यामुळे दिवाळीनंतर बाजारामध्ये पांढऱ्या सोन्याची (कापूस) आवक वाढल्याचे दिसून येते. पण शेतकऱ्यांना मालाला भाव न मिळाल्यामुळे त्यांच्यात नाराजीचे वातावरण पसरले आहे.
केंद्र सरकारने कापसाच्या भावात ५०१ रुपयाची वाढ केली आहे पण शेतकऱ्यांना सरकारी कापूस बाजार न चालू झाल्यामुळे, खासगी बाजारात कापूस विकावा लागत आहे, या खासगी बाजारामध्ये हमीभावापेक्षा कमी भाव मिळाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे.
अमरावती:- तरुणाने मुलीशी लग्न जोडुन कुटुंबियांना सांगितले की मला मुलीशी एकट्यात बोलायचे आहे, व तो…
अमरावती :- २५ वर्षीय तरुणीवर वारंवार दोन व्यक्तींनी अत्याचार केला, आक्षेपार्ह फोटो व्हिडिओ व्हायरल करण्याची…
बुलढाणा:- मारहाण करून अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस ४ वर्षाचा कारावास व ११ हजार रुपये…
अकोला:- कचरा व्यवस्थापनासाठी घराघरांवर शहरात क्युआर कोड लावले या कोडचा वापर शहरातील घरामधील कचरा नियमित…
अमरावती:- रेशनच्या ई - केवायसीसाठी ३१ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे, सार्वजनिक प्रणाली अंतर्गत रेशनकार्ड…
यवतमाळ :- मानसिक विकलांग बालकावर अत्याचार करणाऱ्या आरोपींना ५ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे,…
This website uses cookies.