गोंदिया जिल्ह्यामध्ये दुर्गा विसर्जनासाठी तलावावर गेलेल्या तीन तरुणांचा तलावात बुडून मृत्यू झाला.ही घटना शनिवारी रात्री १०.३० च्या सुमारास घडली. आशिष फागुलाल दमाहे (२३),विशाल फागुलाल दमाहे (२०),आणि यश गंगाधर हिरापुरे (१९)अशी मृतांची नावे आहेत.
दुर्गादेवी मूर्ती विसर्जनासाठी हे तिन्ही तरुण गावातील तलावावर गेले होते .मूर्ती पूर्णपणे बुडावे म्हणून तिघेही खोल पाण्यात उतरले होते. परंतु मूर्ती विसर्जन करताना खड्ड्यात तोल गेल्याने दोन भावांसह यश हिरापुरे हे बुडाले.
नागरिकांनी त्यांना वाचवण्याचे प्रयत्न केले ,परंतु त्यांचे प्रयत्न अपयशी ठरले. त्यानंतर बचाव पथकाने त्यांचे मृतदेह बाहेर काढले. यातील आशीष दमाहे याची यंदा लष्करात निवड झाली होती. प्रशासकीय प्रक्रियेनंतर तो भारतीय लष्करात सहभागी होणार होता. परंतु काळाने घाला घातला अन् आशिषचा बुडून मृत्यू झाला.या घटनेसंदर्भात रावणवाडी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
अमरावती:- तरुणाने मुलीशी लग्न जोडुन कुटुंबियांना सांगितले की मला मुलीशी एकट्यात बोलायचे आहे, व तो…
अमरावती :- २५ वर्षीय तरुणीवर वारंवार दोन व्यक्तींनी अत्याचार केला, आक्षेपार्ह फोटो व्हिडिओ व्हायरल करण्याची…
बुलढाणा:- मारहाण करून अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस ४ वर्षाचा कारावास व ११ हजार रुपये…
अकोला:- कचरा व्यवस्थापनासाठी घराघरांवर शहरात क्युआर कोड लावले या कोडचा वापर शहरातील घरामधील कचरा नियमित…
अमरावती:- रेशनच्या ई - केवायसीसाठी ३१ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे, सार्वजनिक प्रणाली अंतर्गत रेशनकार्ड…
यवतमाळ :- मानसिक विकलांग बालकावर अत्याचार करणाऱ्या आरोपींना ५ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे,…
This website uses cookies.